आपला जिल्हा

जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी आ.कैलास गोरंटयाल यांची घेतली  भेट, मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची शासनाने सखोल चौकशी करावी – आ. कैलास गोरंटयाल 

Spread the love

 जालना | प्रतिनीधी – मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये मोठया प्रमाणात घोटाळा झाला असून या झालेल्या घोटाळ्याची उच्चस्तरीय समिती मार्फत सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी फेर लेखी परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी आ.कैलास गोरंटयाल यांनी आज शनिवारी येथे बोलतांना केली आहे.


मुंबई पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून यामुळे आमच्यावर मोठा अन्याय झाला अशी व्यथा मुंबई पोलीसांच्या वतीने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत अन्याय झालेल्या जालना जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी आ.कैलास गोरंटयाल यांची भेट घेऊन मांडली.अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृहात मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत अन्याय झालेल्या परीक्षार्थींनी आज शनिवारी दुपारी आ.गोरंटयाल यांची भेट आपल्यावर झालेल्या अन्यायाचे कथन त्यांच्यासमोर केले.

अन्यायग्रस्त परीक्षार्थीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आ.कैलास गोरंटयाल यांनी उपस्थित अन्यायग्रस्त तरुण आणि तरुणींना धीर देत ते म्हणाले की,मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अन्य जिल्ह्यातील परीक्षार्थीवर देखील अन्याय झाला असेल अशी शंका व्यक्त करून लेखी परीक्षेच्या वेळी पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी गुगल सर्च करून बटण कॅमेऱ्याच्या माध्यमातून परीक्षेचा पेपर बाहेर पाठवून सार्वजनिक करत मायक्रोफोनद्वारे
प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप करत यासाठी परीक्षार्थीकडून प्रत्येकी १० ते १२ लाख रुपयांची लाच घेण्यात आल्याचे अन्यायग्रस्त परीक्षार्थींनी सांगितल्याचे आ.कैलास गोरंटयाल म्हणाले.

या प्रकरणी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच मुंबई येथे भेट घेऊन मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याबरोबरच जालना जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मुंबई पोलिस भरतीची लेखी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करणार असल्याचे आ.गोरंटयाल यांनी सांगितले.

दरम्यान,या पोलिस भरतीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आपण दि.२२ मे सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदाताई पवार,गणेश चांदोडे,गणेश दाभाडे,संतोष खरात यांच्यासह मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत अन्याय झालेले परीक्षार्थी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!